जनतेच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीत प्रवेश : आमदार भारत भालके - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

जनतेच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीत प्रवेश : आमदार भारत भालके



मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे आमदार भारत भालके यांनी सांगितले ते प्रवेश केल्यानंतर मंगळवेढा येथे आले होते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.




राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रथमच भालके मंगळवेढ्यात आले होते कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

आ.भारत भालके पुढे बोलताना म्हणाले की, मी जनतेची कामे केली आहेत म्हणून जनता मला निवडून देत आहे.उमेदीत केले नाही ते आत्ता काय करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.आघाडीचा धर्म पाळणार असुन युती टिकणार आहे का हा सवाल उपस्थित होत आहे.





2004 नंतर मी कधीही मातोश्रीवर गेलेलो नाही.उध्दव ठाकरे यांचे कॉल आले जनतेची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.राधाकृष्ण विखे पाटील व मुख्यमंत्री हे चहापानासाठी घरी आले होते त्याला प्रसारमाध्यमानी वेगळीच चर्चा केली.भोसे ३९ गाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळाले.

३५ गावाची योजना पूर्ण करण्यासाठी ही प्रमुख भूमिका असेल त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत.म्हैसाळ च्या पाण्यासाठी मी २०१२ पासून मी प्रयत्न करत आहे. यासाठी अनेक लोकांनी विनाकारण श्रेय घेण्याचा सपाटा लावला आहे.यामध्ये अनेक गावे कमी करण्यात आली आहेत.राजकारण न करता जनतेची भावना जाणून घेतल्या पाहिजेत.

जे घरी जाऊन झोपतात त्यांना मी प्रश्न उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी काय माहिती.मतदार संघातील प्रश्नासाठी मी कधीही पाप केले नाही.मी पैसे न मिळवता माणसे मिळवली आहेत.जे लोक २० वर्ष सत्तेत असताना मतदार संघातील एक ही प्रश्न मार्गी लावला नाही.येणारी निवडणूक अटीतटीची नसून केलेल्या कामावर जनता निवडून देणार असल्याचे भालकेंनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा