मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अजूनही गत वर्षीच्या अनुदानापासून वंचित असून येत्या आठ दिवसात अनुदान न मिळाल्यास प्रहार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिली आहे.
जर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं अनुदान न मिळाल्यास प्रहार शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले असा इशारा प्रहारचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी प्रांताधिकादाराना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी अतुल चव्हाण, हनुमंत चव्हाण ,आप्पा बनसोडे नंदुर चे सरपंच परमेश्वर येनपे , बाबा इनामदार, अण्णाप्पा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा