टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिना भरापासून सर्व राजकीय नेते, नागरिकांकडून महाराष्ट्रात कधी लागणार लॉकडाऊन? अशी चर्चा केली जात होती. मात्र या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विराम देत आठ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.
त्यानुसार अखेर गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरवात झाली. आजपासून नागरिकांना केवळ अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आठ वाजल्यापासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध ठेवण्यात आलेले आहेत. त्यास सुरवातही झाली आहे.
निर्बंधांनुसार सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे.
मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे.
तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
ठाकरे सरकारने घालून दिलेल्या काही महत्वाच्या नियमांचं 1 मे पर्यंत लोकांनी पालन करावयाचे आहे. नियमावलीत नेमके नियम कोणते?
रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन , '1 मे'च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन, सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद , सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद.
राज्यात जिल्हा बंदी लागू, अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद , सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी, खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी, सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार.
एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार, अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा,खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड,सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार, लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी, लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार, बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार.
होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक, कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार,फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9970766262 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा