अनेक गोष्टींचा त्याग करून समाजाला चांगली दिशा देण्याचे काम वारकरी अखंडपणे करत आहेत. हे काम करत असताना वारकऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या वारकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व वारकऱ्यांच्या सन्मानार्थ मंगळवेढा येथे भव्य वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मंगळवेढा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी दिली. ते नंदेश्वर येथे मंगळवेढा शहरात होणाऱ्या भव्य वारकरी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करताना वारकर्यांशी बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष गोपाळ कोकरे , उपाध्यक्ष मल्लिकार्जुन राजमाने, रमेश माने, ज्ञानेश्वर गरंडे श्रीराम बंडगर भाऊ गरंडे हे उपस्थित होते.
अखिल भारतीय वारकरी मंडळ मंगळवेढा शहर व तालुका यांचे वतीने मंगळवार दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता मंगळवेढा येथील दामाजी मंदिरात भव्य वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज, जिल्हाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, तात्यासाहेब जगताप महाराज, राजाराम कदम महाराज, बजरंग माळी, चिक्कलगी-भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज, सिद्धेश्वर कोळी, भागवत गवळी, पांडुरंग माने, शिवाजी घोडके, प्रा. विनायक कलुबर्मे यांचेसह अनेक संत उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती यावेळी तालुकाध्यक्ष निलेश गुजरे व शहराध्यक्ष माऊली भगरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा